India Alliance Broke Again। देशातील लोकसभा निवडणूक आता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यातच सगळे पक्ष युती करणे, पाठींब्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देताना दिसत आहेत. त्यातच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने इंडिया आघाडीची साथ सोडल्यानंतर आता या आघाडीला असाच आणखी एक धक्का बसलाय. इंडिया आघाडीला झारखंडमधूनही मोठा झटका बसलाय. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) ने झारखंडमधील विरोधी आघाडी ‘इंडिया’पासून वेगळे होण्याची घोषणा केली. तसेच ते राज्यातील 14 लोकसभेच्या 8 जागांवर स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली.
…त्यामुळेच एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय India Alliance Broke Again।
सीपीआयचा लोकसभेत झारखंडमधून एकही खासदार नाही. सीपीआयचे राज्य सचिव महेंद्र पाठक यांनी ,”आम्ही लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे.” असे ते म्हणाले, तसेच “भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र काँग्रेस आणि ‘महाआघाडी’ने अद्याप घोषणा केलेली नाही. जागावाटपावर कोणतीही चर्चा झाली. त्यामुळेच आम्ही एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे “असे त्यांनी म्हटले.
16 मार्च रोजी उमेदवारांची घोषणा India Alliance Broke Again।
पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सीपीआय रांची, हजारीबाग, कोडरमा, चतरा, पलामू, गिरिडीह, दुमका आणि जमशेदपूर लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार आहे. 16 मार्चनंतर उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे पाठक यांनी सांगितले. दरम्यान, झारखंडमधील सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) म्हटले आहे की, सीपीआयच्या राज्य युनिटचा हा निर्णय पक्षातील शिस्तीवर प्रश्न निर्माण करतो.
जेएमएमचे प्रवक्ते मनोज पांडे म्हणाले, ‘राज्य युनिट असे निर्णय घेऊ शकते की नाही हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. जागावाटपाची चर्चा आतापासूनच राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे” असे त्यांनी म्हटले. राज्यातील 14 लोकसभेच्या जागांपैकी भारतीय जनता पक्षाकडे 11, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (AJSU) कडे एक, JMM आणि काँग्रेसकडे एक जागा आहे. मात्र, काँग्रेसच्या एकमेव खासदार गीता कोडा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता.