Usha Naik। काही दिवसांपूर्वी ५७वा ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट’ पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी उषा नाईक यांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र त्या पुरस्कारापेक्षा त्यांनी केलेल्या एका वाक्यावरून सध्या त्या प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यांनी एका मुलाखती दरम्यान मोठं विधान केलंय. “मी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर खूपच कौतुक झालं असतं”, असं म्हटलंय. त्यांच्या या वाक्याची सर्वत्र चर्चा होताना दिसतीय,
मी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर खूपच कौतुक झालं असतं Usha Naik।
उषा नाईक यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनलला मुलाखती दिली. यावेळी त्यांना तुम्ही आजपर्यंत अनेक चित्रपटात काम केलं पण यात तुम्ही मुख्य भूमिकेऐवजी साईड रोलमध्ये जास्त दिसला असं का ? या प्रश्नावर उत्तर देताना उषा नाईक यांनी मोठं विधान केलंय. यावेळी उषा नाईक म्हणाल्या, “त्याचं कारण मला माहिती नाही. मी स्पष्ट बोलणारी असल्यामुळे सांगते की, माझ्या आडनावामुळे मला बऱ्याच ठिकाणी डावलण्यात आलं. मी नाईक आहे. मी अगदी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर खूपच कौतुक झालं असतं. पण माझं तसं नाही झालं. मी नेहमीच सांगते. माझं असं म्हणणं आहे, या वेळेला, या वयाला आल्यानंतर स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. पूर्वी बोलत नव्हते आता मी बोलायला लागले आहे. ते पण स्पष्ट बोलते.” असे त्यांनी म्हटलं.
मी बरंच काम केलंय हे दाखवायची सवय नाही Usha Naik।
पुढे उषा नाईक म्हणाल्या, “एक तर माझा कुणी गॉडफादर नाही. छोट्या कुटुंबातून आले आहे. देखावा कसा करायचा? हे माहित नाही. फार आपण कोणीतरी आहोत, मला काहीतरी मिळालेलं आहे, मी बरंच काम केलंय हे दाखवायची सवय नाही. तेव्हा नव्हती आणि आजही नाही. कदाचित ही सवय मला पुढे देखील नसणार. कारण मी आध्यात्मिक आहे. माझ्या गुरुंच्या अध्यात्मात माझी मनाची जडणघडण होतेय. त्यामुळे तिथे बाह्य रंगाला काहीच किंमत नसून अंतरंगाला किंमत असल्यामुळे कदाचित त्या गोष्टीचं मला फारस मौल वाटतं नाही. असे त्या म्हणाल्या.