कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा सरकारवर आरोप
अहमदाबाद : कॉंग्रेस नेते हार्दिक पटेल यांना 2015 च्या एका देशद्रोहाच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री त्यांना अहमदाबाद जिल्ह्याच्या विरमगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. देशद्रोहाच्या प्रकरणात पटेल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरुन कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. समाजातील लोकांचा आवाज उठविणाऱ्यांना भाजप देशद्रोही म्हणत आहे.
युवाओं के रोजगार और किसानों के हक की लड़ाई लड़ने वाले युवा हार्दिक पटेल जी को भाजपा बार-बार परेशान कर रही है। हार्दिक ने अपने समाज के लोगों की आवाज उठाई, उनके लिए नौकरियां मांगी, छात्रवृत्ति मांगी। किसान आंदोलन किया।
भाजपा इसको “देशद्रोह” बोल रही है।https://t.co/DcmiAvMrAh
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 19, 2020
प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ‘युवा तरुणांच्या रोजगारासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या युवा हार्दिक पटेल जी यांना भाजपा त्रास देत आहे. हार्दिकने आपल्या समाजातील लोकांना आवाज दिला, त्यांच्यासाठी नोकरी मागितली, शिष्यवृत्तीची मागणी केली. शेतकरी आंदोलन झाले. भाजपा त्याला ‘देशद्रोही’ म्हणत आहे.