मुंबई – करोनाचा धोका पूर्णपणे संपलेला नसल्याने पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेसाठी बीसीसीआयने अत्यंत कठोर नियमावली तयार केली आहे. बायो-बबलचा नवा नियम सर्वांनाच पाळावा लागणार आहे.
खेळाडूंसह स्टाफ सदस्य आणि सामना अधिकाऱ्यांनाही बायोबबलच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. नियामाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. यात बंदी पासून ते 1 कोटी रुपये दंडात्मक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
बबलमधून बाहेर पडल्याचे निदर्शनास आल्यास खेळाडू, स्टाफ सदस्य किंवा सामना अधिकाऱ्याला 7 दिवस विलगीकरणात राहावे लागेल. बायोबबलचे उल्लंघन करुन कोणत्याही संघाने एखाद्या खेळाडूला बाहेरील व्यक्तीला भेटण्याची परवानगी दिली तर त्या संघावरही कारवाई होणार आहे.