कोलंबो – श्रीलंकेतील आंदोलनाने सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले आहे ज्या आंदोलनाने श्रीलंकेतील भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना सत्ता सोडावी लागली त्या आंदोलनाची सुरुवात चार महिन्यापूर्वी फक्त सहा युवकांनी केली होती. हळूहळू त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळून त्याने लोकचळवळीचे रूप धारण केले आणि अखेर सत्ताधाऱ्यांची गच्छंती झाली.
श्रीलंकेत १ मार्च रोजी सहा लोकांनी एक आंदोलन केले होते, त्यावेळी श्रीलंकेतील वाढते लोडशेडिंग आणि महागाईच्या विरोधात सहा व्यावसायिक तरुणांनी आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणाच्या बाहेरच एक दिवसाचे आंदोलन केले होते. ही लंकेतील लोक आंदोलनाची सुरुवात होती या सहा युवा व्यावसायिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन आंदोलन केले होते प्रारंभी या आंदोलनाची सर्वांनी थट्टा केली होती कोणीच प्रतिसाद दिला नव्हता. दुसऱ्या दिवशी मात्र या आंदोलनामध्ये आणखीन पन्नास लोक सहभागी झाले आणि नंतर या आंदोलनामध्ये शेकडो त्यानंतर हजारो लोक सहभागी झाले.
श्रीलंका सरकारने प्रारंभी या सर्व आंदोलकाना दहशतवादी म्हटले होत आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले होते पण या आंदोलनामुळेच आपल्याला सत्ता सोडावी लागेल याची कोणतीही कल्पना राजपक्ष परिवाराला आली नाही. ज्या सहा तरुणांनी हे आंदोलन सुरू केले होते त्यांच्या हातातून नंतर नेतृत्व निसटून गेले आणि इतर काही जण या आंदोलनाचे नेते झाले.
नंतर या आंदोलनाला कोणता नेताही उरला नाही ज्याप्रकारे श्रीलंकेतील सरकारी मालमत्ता आणि राष्ट्रपती भवन पंतप्रधान कार्यालय यांचा ताबा घेण्याचे काम आंदोलकांनी केले ते पाहता या आंदोलनाला कुठलाही नेता उरला नव्हता पण या आंदोलनाच्या तीव्रतेमुळे राजपक्ष परीवाराला आपली सत्ता सोडावी लागली असली तरी या सर्व आंदोलनाची ठिणगी सहा युवकांनी टाकली होती त्याचा विसर आता सर्वांनाच पडला आहे.