मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या ईडी कोठडीत आहेत. राऊत यांनी ईडी कोठडीतून दैनिक सामनासाठी रोखठोक लिहीत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र आता राऊत यांनी ईडी कस्टडीतुन केलेल्या लिखानावारून राऊत यांनी जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? असा सवाल मनसेच्या वतीने विचारण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनी मुंबईबाबत एक वादग्रस्त विधान केलं होत त्यानंतर त्यांना माफी देखील मागावी लागली. हाच धागा पकडून राऊत यांनी रोखठोकमधून कोश्यारींना इतिहासाची आठवण करून दिली. विशेष म्हणजे संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणी ईडी कस्टडीमध्ये आहेत. यावरूनच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
संदीप देशपांडे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात,”आज सामनामध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? असा सवालही यावेळी देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 7, 2022
काय म्हटलंय नेमकं राऊतांनी रोखठोकमध्ये
“महाराष्ट्रात व खासकरून मुंबईत गुजराती समाज पूर्वापार आहे, पण मुंबईवर हक्क आणि पगडा मराठी माणसाचाच राहील. मुंबईत मराठी माणसाचा ‘टक्का’ कमी झाला. मुंबईची आर्थिक सूत्रे मराठी माणसाकडे नसतीलही, पण ही मुंबई मराठी माणसानेच घडवली असे इतिहास सांगतो. मुंबईवर मराठय़ांचे राज्य कधीच नव्हते, असे सांगण्याचा वारंवार प्रयत्न झाला. मुंबईवर मराठय़ांनी कधीच राज्य केले नाही, गुजरातने मात्र केलेले आहे असा संदर्भ आजही काही लोक देत असतात. तो खरा नाही असं राऊत यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.