नवी दिल्ली – मालदीव हा देश कायमच भारत विरोधी राहीलेला आहे असे नाही. त्या देशातील अनेक नेते भारत समर्थक आहेत. त्या देशातील सरकारे कायमच बदलत असतात. त्यामुळे ते आपल्या धोरणांचा फेरविचार करतील असे कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे.
भारताने मालदीवला केलेल्या मदतीचे त्या देशाला स्मरण करून देताना थरूर म्हणाले की ज्यावेळी त्या देशाकडे पिण्याचे पाणी नव्हते, तेव्हा आम्ही त्यांना पाण्याची उपलब्धता करून दिली होती. तेंव्हा तेथे सत्तेत असलेला पक्ष भारत विरोधी अर्थात इंडिया आउट अभियान राबवत होता त्यावेळी आम्ही त्यांना ही मदत केली होती.
मालदीवमध्ये १०० टक्के लोक मुसलमान आहेत. मात्र तेथे पाकिस्तानचा विशेष प्रभाव नाही. लहान शेजारी देशांना कायमच शेजारच्या मोठ्या देशांची अडचण राहीलेली आहे. मात्र आपल्याला आपले धोरणांची अमलबजावणी अत्यंत परिपक्वतेने करायला हवी.
आज मालदीवचे सरकार चीनच्या जवळ जाते आहे. अशा स्थितीत आपण त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते शेजारी देशाशी जवळीक वाढवत असल्यामुळे आपल्याला अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे.