नवी दिल्ली – पुलवामा हल्ल्यानंतर फेब्रुवारी रोजी भारतीय हवाईदलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उद्वस्त केले होते. या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ही कारवाई गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात महत्त्वपूर्ण कारवाई होती, अशी प्रतिक्रिया इंग्रजी वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हवाईदल प्रमुख यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा याद्वारे पाकिस्तानला देण्यात आला होता असंही ते म्हणाले.
भदोरिया पुढे म्हणाले,’आपल्या लढाऊ विमानांनी त्या ठिकाणी दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान न होता आपण परतलो. कोणी पुन्हा अशा कुरापती केल्या तर त्याचा परिणाम काय होईल असा इशारा याद्वारे देण्यात आला, बालाकोटमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी तळ सुरू झाल्याच्या चर्चा होत आहेत. आम्ही त्यांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून आहोत. बाळकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्यापूर्वी संपूर्ण योजना आखण्यात आली होती. आम्हाला टार्गेट देण्यात आल होत मात्र, लक्ष्य साधण्यासाठी हत्यार आम्ही निवडली. आपल कमीतकमी नुकसान व्हावं हे आम्ही ध्यानात ठेवलं होतं. आम्ही योग्य ती कारवाई केली आणि समोरच्यालाही याची कल्पना आहे असंही त्यांनी नमूद केलं. त्यांनी दिलेल्या मुलाखतीत बालाकोटबाबत माहिती दिली.