नवी दिल्ली – रोजगार, शेतकरी, युवक आणि मजूर यासारख्या घटकांच्या समस्येवर पंतप्रधान काहीच बोलत नसतील तर भाजपने चारशेचा टप्पा पार करून उपयोग काय असा सवाल राजदेचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी देशातील खऱ्या समस्यावर ते बोलत नसतील तर ४०० जागा विसरून जा; लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए युतीला १०० जागाही जिंकता येणार नाहीत.
तत्पूर्वी, पीएम मोदींच्या बिहारच्या जमुईतील भेटीच्या संबंधात तेजस्वी यादव म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी किमान आपण जमुईच्या विकासासाठी काय केले ते सांगायला हवे होते. आता आम्ही जमुईला जात आहोत आणि लोकांसमोर आमची मते मांडणार आहोत.
जेव्हा पंतप्रधान मोदी जमुईला गेले तेव्हा ते परिवारवादा बद्दल बोलले नाहीत कारण बिहारमध्ये सर्वत्र त्यांचेच उमेदवार कोणत्या ना कोणत्या राजकीय घराण्यातील आहेत.पंतप्रधानांनी किमान त्यांनी जमुईच्या विकासासाठी काय केले ते सांगितले पाहिजे होते असे ते म्हणाले.
बिहार मध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी चार जागांवर मतदान होणार आहे. औरंगाबाद, गया, नवादा आणि जमुई या ठिकाणी हे मतदान हेात असल्याने सर्वच राजकीयपक्षांनी या चार जागांवरील आपला प्रचार वेग वाढवला आहे. बिहार मध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.