बंगळुरू :- वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने दोन्ही डावांत मिळून 12 गडी बाद केल्यावरही भारताचे माजी कसोटीपटू व माजी कर्णधार अनील कुंबळे यांनी त्याचे कौतुक करणे टाळले आहे.
त्यातच अश्विनने जरी सरस कामगिरी केली असली तरीही रोटेशननुसार डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवलाही संघात संधी मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कुलदीपला कसोटीत खेळवले जाणार नसेल तर त्याला कोणत्या सामन्यात खेळवणार. त्याने प्रत्येकवेळी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी त्याचा विचारच केला जात नाही मग निदान कसोटीत तरी त्याला प्राधान्य द्यावे, असेही कुंबळे म्हणाले.