मुंबई- भोंग्याबाबतच्या राज ठाकरेंच्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना आणि राज्यातील राजकारण हमरी तुमरीवर गेले असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकाच धर्माला लक्ष्य करण्याचा हा सारा अमानवीय प्रकार सुरू असल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे.
सध्या राज्यात भोंग्याचे नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे, अशी टीका पाटकर यांनी केला आहे. अस्मितेचे प्रश्न उठवायचे आणि अस्तित्वाचे प्रश्न नाकारायचे असे सध्याच्या राजकारणाचे स्वरूप झाले आहे.
एका धर्माच्या मतांचे गठ्ठे मिळवण्याठी ही सर्व उठाठेव सुरू असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपानंतर प्रथमच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने याबाबत भाष्य केले आहे.