T20 World Cup 2024, Team India :- अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात निवडला जाण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) संघ सादर करण्याची अंतिम मुदत १ मे ठेवण्यात आली आहे.
असे असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सुत्रांच्या माहितीनुसार स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला २५ मे पर्यंत त्यांच्या सुरुवातीच्या संघातील खेळाडू बदलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे, भारतीय संघाची निवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात केली जाईल आणि तोपर्यंत इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) पहिला भाग संपेल. ज्यातील कामगिरीचाही राष्ट्रीय निवड समिती आढावा घेईल. त्यानंतर १९ मे रोजी आयपीएलचा लीग टप्पा संपल्यानंतर क्रिकेटपटूंची पहिली तुकडी न्यूयॉर्कला रवाना होणार आहे.
यंदाच्या स्पर्धेसाठी मुख्य संघातील कोणताही खेळाडू जखमी झाल्यास किंवा कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीमुळे काही ‘स्टँड बाय’ खेळाडू देखील संघासोबत प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. त्यात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी नुकतेच जाहीर केल्याप्रमाणे यंदाच्या टी-२० विश्वकरंडकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उतरणार आहे.
T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकासाठी BCCI ‘या’ 15 खेळाडूंची करू शकते निवड, पहा यादी…
दरम्यान, आगामी T20 विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये आयोजित केली जाणार आहे. आयपीएल संपल्यानंतर 1 जूनपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. भारत अ गटात असून त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा भारतीय कर्णधार असेल याची पुष्टी केली आहे. एकदिवसीय विश्वचषकानंतर रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार होऊ शकतो असे बोलले जात होते पण जय शाहने रोहितच कर्णधार असेल याची पुष्टी केली आहे.