Baramati Loksabha : कर्जत येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp Karjat Adhiweshan) अधिवेशनात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा जागा वाटपावर आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले,’बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. सध्या या जागा आपल्याकडे आहेत. अजित पवार यांच्या घोषणेनंतर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.(Pawar vs Sule)
“मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी भारताची आणि महाराष्ट्रातील नागरिक आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण कुठून लढणार हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी मनापासून याचं स्वागत करते, कारण ही लोकशाही आहे” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केले. (Baramati loksabha)
कुटुंबातील व्यक्तीच विरोधात उभी असेल तर काय करणार ? असा सवाल विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या,”मी लोकप्रतिनिधी आहे. मी लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आली आहे. ही लढाई नाही आहे. दोन वेगळे विचार आहेत.आमची नाती एका जागेवर आहेत आणि राजकारण वेगळं आहे. प्रोफेशन आणि नात्यात कधीच गल्लत करायची नसते. मी लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा केली आहे. लोकशाहीत कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. यात काहीही गैर नाही. बाकी महाराष्ट्र आणि बारामतीतील मायबाप जनता ठरवेल” असं देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
काय म्हणाले होते अजित नेमकं नेमकं
बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. सध्या या जागा आपल्याकडे आहे. परंतु इतर काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे.शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे असणाऱ्या काही जागा आपण लढवणार आहोत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय होणार आहे. पाच राज्यातील निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी महाराष्ट्रातील जागांवर चर्चा होणार आहे.