Supriya Sule On BJP । ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील बारामतीत मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसतायेत. बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघीही एकमेकींच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उभ्या राहणार असल्याच्या चर्चां रंगात आहेत.
अशात बारामती व्यापारी महासंघ आणि दी बारामती मर्चंट असोसिएशन तर्फे आज बारामतीमध्ये व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या,’दिल्लीत मंत्री होता आलं असतं, मात्र आम्ही संघर्ष आणि सत्याचा मार्ग निवडला’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Supriya Sule On BJP । नेमकं काय म्हणाली सुप्रिया सुळे
‘मी दिल्लीत मंत्री झाली असती आणि रोहित पवार राज्यात मंत्री झाले असते. सत्ता आणि अदृश्य शक्ती, दुसऱ्या बाजूला वडील, विचार, संघर्ष आणि सत्य होतं. तुम्ही (कार्यकर्त्यांना उद्देशून त्या असं म्हणाल्या) माझ्या जागी असता तर काय केलं असतं, कोणत्या बाजूने बसला असता, सत्याच्याच.’ असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित जनतेला विचारत मोदी सरकार टीका केली.
बारामती हे पुरोगामी महाराष्ट्राचे एक मोठं केंद्र आहे. आम्ही रोज संघर्ष करत आहोत. बारामतीमध्ये त्यांच्याकडे एक कार्यकर्ता नाही, माझ्या विरोधात उभं करायला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना आमचं घर फोडावे लागले.’ असेही त्या म्हणाल्या आहे.
तत्पूर्वी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार आवाहन केले की,’बारामतीकरांनी संधी दिल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत आवाज उठविला. संसद रत्न पुरस्कार मिळवून त्यांनी बारामतीचा नवलौकिक वाढवला आहे. यंदाही सुप्रियाला संधी द्या’ बारामती स्वाभिमानी व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते.
हे वाचले का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा,’मला कुणी फसवू शकत नाही. सगळ्या आमदार खासदारांची कुंडली…’