नवी दिल्ली – मागील दोन महिन्यांपासून कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका मांडली. आधी पाठिंबा दिला होता मग यू-टर्न का ? असा सवालही मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना विचारला.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, शरद पवार यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी कृषी विधेयकांवर सुधारणा करण्याचे मत व्यक्त केले होते. पण त्यांनी कायद्याला विरोध केला नाही. आज आम्ही चांगले विचार मांडले याचा अर्थ असा नाही की, १० वर्षानंतर चांगले विचार असू शकत नाही. पण अचानक आज त्यांनी यू-टर्न का घेतला हे मात्र कळू शकले नाही. तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा सांगू शकता की, नवीन कायदे आहे ते स्वीकारले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली आहे.
त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणातील मुद्देच राज्यसभेत वाचून दाखवले. शेतकऱ्यांना पिक विकण्यासाठी स्वातंत्र्य, भारताला स्वतंत्र्य कृषी बाजार मिळवून देण्यासाठी मनमोहन सिंग यांनी सांगितले होते. आता त्यांनी जे सांगितले होते तेच आम्ही करत आहे. उलट तुम्हाला याबद्दल अभिमान वाटायला हवा होता, असा टोलाही मोदींनी लगावला.