मुंबई : महाराष्ट्र सरकारने कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. याची माहिती उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री @ashokgehlot51 जी यांच्यासोबत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन्ही राज्यांनी केलेल्या उपाय योजना आणि इतर अनेक विषयांवर चर्चा केली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 24, 2020
महाराष्ट्र सरकारने राजस्थान सरकारला विनंती पत्र पाठवले आहे. यामध्ये कोटामध्ये अडकलेल्या १८०० चे २००० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडावे अशी विनंती केली आहे. राज्यात माघारी परतल्यानंतर त्या सर्वांना १४ दिवसांसाठी क्वांरटाइन करण्यात येईल, असेही म्हटले आहे .
महाराष्ट्र व राजस्थान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी राजस्थानातील कोटा येथे असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत चर्चा केली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी त्यांचे कार्यालय कार्यरत आहे. @ashokgehlot51 जी यांना सहकार्याबद्दल धन्यवाद! https://t.co/h6jtUVomLu
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 25, 2020
केंद्र आणि राज्यस्थान सराकरने परवानगी दिल्यानंतर दोन ते तीन दिवासांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी योजना आखली जात आहे. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्राचे १८०० ते २००० विद्यार्थी लॉकडाउनमुळे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या परिवारनं त्यांना परत आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तीन मे पर्यंत राज्य सरकार त्या विद्यार्थांना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडूम कोटामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे.’