मुंबई – फॉक्सकॉन पाठोपाठ महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे फडणवीस सरकार विरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ईडी सरकार महाराष्ट्राचे आहे की गुजरातचे ? असा सवाल उपस्थित करत शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
अंबादास दानवे यांनी ट्विट करत गुजरातला प्रकल्प गेल्याने सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,हे इडी सरकार महाराष्ट्राचे आहे की गुजरातचे ? फॉक्सकोन मविआमुळे गेले अशी ओरड केलीत, आता टाटा-एअरबस कोणामुळे गेला ? या सरकारने ‘जय महाराष्ट्र’ म्हणणे बंद करावे! मिंधे-फसनवीस सरकारने आता ‘जय जय गरवी गुजरात’ हा नारा बुलंद केला पाहिजे”. अशी टीका दानवे यांनी ट्विटरद्वारे केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते पुढे म्हणतात, “केंद्राच्या हुकूमशाहचा आवडता सुभा असलेल्या गुजरात राज्याची विधानसभा निवडणूक भाजपच्या पारड्यात आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार जोरात काम करत आहे. प्रकल्प घालवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे हे सरकार महाराष्ट्राचे कैवारी की द्रोही? आता जनतेनेच सांगावे !”
हे इडी सरकार महाराष्ट्राचे आहे की गुजरातचे? फॉक्सकोन मविआमुळे गेले अशी ओरड केलीत, आता टाटा-एअरबस कोणामुळे गेला? या सरकारने ‘जय महाराष्ट्र’ म्हणणे बंद करावे! मिंधे-फसनवीस सरकारने आता ‘जय जय गरवी गुजरात’ हा नारा बुलंद केला पाहिजे. (१/२)#Airbus #tata
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 27, 2022
फॉक्सकॉन प्रकल्पनांतर हा दुसरा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे आता चांगलाच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत ? असा सवालही आदित्य ठाकरेंनी ट्विटद्वारे उपस्थित केला होता.