मुंबई – समृद्धी महामार्ग झाल्यापासून येथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहे. अनेक कुटूंब या अपघातामध्ये उद्ध्वस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य सरकारकडून समृद्धी महामार्गावर अनेक सुविधा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. समृद्धी महामार्गावर सतत होणाऱ्या या अपघातानंतर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
समृद्धी महामार्गावर एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू केली जाणार आहे. समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अपघातग्रस्तांना मोठी मदत होऊ शकते. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास एअर अॅम्ब्युलन्सने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करता येऊन त्यांच्यावर तातडीने योग्य उपचार करता येऊ शकतील. यासाठी राज्य सरकार संबंधित हेलिकॉप्टर कंपन्यांशी करार करणार आहे.
याशिवाय एअर अॅम्ब्युलन्सने आणलेल्या रुग्णांना त्वरीत उपचार मिळावे, यासाठी नागपूर ते मुंबईदरम्यान महामार्गाजवळ असणाऱ्या खासगी रुग्णालयांसोबत राज्य सरकार करार करणार आहे. एअर अॅम्ब्युलन्सने आणलेल्या रुग्णांना त्वरीत उपचार मिळावेत, यासाठी नागपूर ते मुंबईदरम्यान महामार्गाजवळ असणाऱ्या कित्येक खासगी रुग्णालयांसोबत राज्य सरकार करार करणार आहे. यामुळे केवळ सरकारीसह खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांना उपचार घेता येणार आहे.