नवी दिल्ली – भारतामध्ये स्टार्टअपची संख्या वेगाने वाढत आहे. हे स्टार्ट अप नव्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे यांची नियंत्रण पद्धती आणखी विकसित व्हायची आहे. यासाठी स्टार्टअपने स्वनियंत्रण करण्याची एखादी यंत्रणा तयार करावी, अशी सूचना जी -20 चे शेरपा अमिताभ कांत यांनी केली आहे.
आज झालेल्या स्टार्ट अप महा कुंभमेळ्यात ते म्हणाले की, आगामी काळात भारतातील स्टार्टअप जगातील मोठ्या कंपन्या म्हणून आकारास येथील याबद्दल मला खात्री आहे. भारतामध्ये गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात स्टार्टअपची नोंदणी झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या संदर्भात बरेच गैरसमज निर्माण झाले आहेत.
स्वतःचे मूल्य वाढविण्यासाठी तत्वाचा बळी दिला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. यासाठी स्टार्ट अपनी स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे कांती यांनी सांगितले.