चेन्नई – तामिळनाडू सरकारने 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी द्रमुक पक्षाने लोकांना दिलेली 85 टक्के आश्वासने पूर्ण केली आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केले आहे. विरोधी अद्रमुक पक्षाच्या एका गटाचे प्रमुख पलानीस्वामी यांनी द्रमुकचे स्टॅलिन यांनी खोटी आश्वासने देऊन ही निवडणूक जिंकल्याचा आरोप इरोड पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी हे प्रतिपादन केले.
स्टॅलिन पुढे म्हणाले की, हे तेच पलानीस्वामी होते, जेव्हा ते मुख्यमंत्री असताना (2018 मध्ये) खोटे बोलले होते की, त्यांना थुथुकुडीमध्ये पोलिसांनी गोळीबार केल्याचे टीव्ही पाहिल्यानंतरच कळले. वास्तविक पलानीस्वामी यांनीच पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेश दिले होते आणि अशा नेत्यांकडून अशाच प्रकारच्या खोटारडेपणाची कृती होणार यात नवल नाही अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही केवळ निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता केली नाही, तर निवडणुकीपूर्वी जाहीर न केलेल्या इतर अनेक योजनाही राबविल्या आहेत, असे त्यांनी त्यांच्या ‘उंगलील ओरुवन’ (तुमच्यापैकी एक) मालिकेतील प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.
मीडियाचा आवाज दाबणे म्हणजे जनतेचाच आवाज दाबण्यासारखे – केजरीवाल
मुख्यमंत्र्यांनी मूवलूर रामतीर्थम अम्मैयार उच्च शिक्षण हमी योजनेचा उल्लेख केला आणि तो आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्याचा भाग नसूनही आम्ही त्याची अंमलबजावणी करीत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.