चेन्नई – संसदेत काल राज्यसभेतील मंजुरी नंतर दिल्ली सेवा विधेयक संमत करण्यात आले. केवळ केजरीवाल सरकारवर कुरघोडी करून त्यांचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न असून हे विधेयक संमत होणे हा लोकशाहीसाठी काळा दिवस आहे असा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केला आहे.
राजधानी दिल्लीला साध्या महापालिकेत अवनत करण्याचा हा ठराव आहे.भाजपचा फॅसिझम विरोधकांची राज्ये असलेल्या सरकारांमध्येही असाच हस्तक्षेप करण्याची भीती यातून निर्माण झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे. स्टॅलिन म्हणाले की लोकांना भाजपचे डावपेच समजले आहेत.
त्यांना जळत असलेल्या मणिपुराची चिंता नाही, ते मणिपूरमधील संकट सोडविण्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत परंतु दिल्ली नष्ट करण्याकडे लक्ष देत आहे. भाजपला या षडयंत्राची शिक्षा केवळ दिल्ली राज्यातील जनताच नव्हे तर नाही तर संपूर्ण देशातील जनता लवकरच देईल असे ते म्हणाले.