वर्धा – वर्ध्यातील आष्टीच्या तेलाई घाटात एसटी बस उलटल्याने भीषण अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती जिल्ह्याच्या वरुड येथून ही एसटी तळेगावला येत होती. यावेळी तेलाई घाटात एसटी उलटून हा भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील ४० प्रवासी जखमी झाले. बसच्या महिला चालकाकडून दुचाकीला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. पाच रुग्णावाहिकांमधून जखमींना नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले असून यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.