सातारा – उदयनराजे यांना सातत्याने मिशीवाल्यांचा सामना करावा लागतो, असे मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत मिशीवाल्या नरेंद्र पाटील यांनी धनुष्यबाणावर निवडणूक लढवून साडेचार लाख मते घेतली होती.
श्रीनिवास पाटील यांच्या मिशीचीही क्रेझ आहे. पहिल्या पाटलांनी मिशीला पीळ दिला, पण ताकद कमी पडली. आता श्रीनिवास पाटलांच्या मिशीचा पीळ साताऱ्यात परिवर्तन घडवणार का, याची उत्सुकता आहे.