मुंबई : देशभरातील कोरोनाचे सावट कमी होत असल्याचे दिसत असताना मागच्या महिन्यापासून यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग देखील वाढवला आहे. सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच 45 ते 60 या वयोगटातील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. आता त्यानंतर लवकरच लसीकरणाचा पुढील टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात 50 वर्षांच्या वरील वयोगाटातील नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, ५० वर्षाच्या पुढील नागरिकांचे या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे.
लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याची माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिली आहे. ‘कोणत्या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण कधी करायचे याबाबतचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. या सर्वांचे एकाच टप्प्यात लसीकरण शक्य नाही. त्यामुळे सरकारने प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहे. सुरुवातीला कोरोना पेशंट्सच्या सर्वाधिक संपर्कात असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्यात आली. आता सामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. देशातील सर्व नागरिकांचे त्यांच्या वयानुसार गट पाडण्यात आले आहेत.’ असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
कोरोना लसीकरणाबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, 50 वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींचीही दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या गटाला म्हणजेच 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्याची मोहीम सध्या सुरु आहे. त्यानंतर आता 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
या विषयावरील एका रिपोर्टनुसार,’गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांमध्ये वाढवण्यात आला आहे. आता लवकरच आणखी एका टप्प्यातील नागरिकांचा त्यामध्ये समावेश करण्यात येईल. देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरु झाली आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 2.56, 85,011 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.