जंक्शन येथे अर्थमंत्र्यांचा पारंपरिक सत्कार
लासुर्णे – जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे. इंदापूर तालुक्यातून पालखी महामार्गासह तीन महामार्ग जाणार असल्याने तालुक्याच्या सर्व बाजूंचा विकास होणार असल्याचे मत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
मंत्री सीतारामन यांचा जंक्शन (ता. इंदापूर) येथे सत्कारवेळी बोलत होते. सितारामन यांनी पालखी महामार्गाची माहिती करून घेतली. हर्षवर्धन पाटील म्हणाले, जगद्गुयु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास 400 वर्षाची परंपरा आहे. पालखी महामार्ग 39 गावांमधून जाणार असून सुमारे 1100 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांच्या जमिनींना पाचपट मोबदला दिला गेला आहे.
महामार्गाचे काम सप्टेंबर 2021मध्ये सुरू झाले असून, डिसेंबर 2023पर्यंत पूर्ण होणार आहे. पालखी महामार्गाबाबत लासुर्णे येथे मिनी उड्डाण पुलाबाबत जंक्शन चौक उड्डाणपुलाबाबत, शेळगाव येथे उड्डाणपुलाच्या उंची बाबत अडचणी आहेत. संबंधित गावातील अडचणी सोडविण्यासाठी सितारामन यांनी मदत करण्याची मागणी पाटील यांनी केली.
यावेळी बारामती लोकसभा प्रभारी राम शिंदे, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, बाळा भेगडे, गणेश भेगडे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, वासुदेव काळे, तालुका अध्यक्ष शरद जामदार, तानाजी थोरात, राजवर्धन पाटील, अंकिता पाटील, गजानन वाकसे, रोहित मोहोळकर, युवराज मस्के, सचिन आरडे, तुकाराम वाडकर, पांडुरंग सुळ, तेजेस देवकाते, गोविंद देवकाते, पांडुरंग कचरे, माऊली ताकवणे उपस्थित होते.