सोलापूर – करोना महामारीच्या संकटाने देशात हाहाकार माजवला असून कोरोनाने अनेकांना फारच वाईट दिवस दाखवले आहेत. कुटुंबातील कर्तीसवरती माणसे डोळय़ादेखत निघून जात आहेत. तर माता-पिता, भाऊ-बहीण असे सामुदायिक मृत्यू होत असल्याने हसत्या-खेळत्या कुटुंबांवर स्मशानकळा येताना दिसून येत आहेत. सोलापूरातीलल अशीच हृदयाचे ठोके वाढविणारी घटना समोर आली आहे. टेंभूर्णी येथील शेख कुटुंबातील दहा दिवसात पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेख कुुटुंबातील कर्ती माणसे करोनाने हिरावून घेतली आहेत. २७ एप्रिल रोजी घरातील कर्ता पुरुष हनिफ मौला शेख वय ६८ यांचा मृत्यू झाला. शेख कुटुंब यामधून सावरत नाही तोच १ मे रोजी ईल्लला हनिफ शेख वय ६१ यांच्या मृत्यू झाला. त्यानंतर भाऊ इक्बाल हनिफ शेख यांचा ५ मे रोजी मृत्यू झाला. त्याच दिवशी सावत्र आई रुक्साना हनिफ शेख वय ५५ यांच्या सुद्धा मृत्यू झाला. ६ मे रोजी २४ वर्षीय अर्जिया भैय्या शेख यांचा मृत्यू झाला. दहा दिवसात शेख कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. नशिबााला दोष द्यायचा की आरोग्य व्यवस्थेला असा प्रश्न या घटनेवरून उपस्थित होत आहे.
देशासह राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र समोर येत असताना अशा घटना समोर येत आहे. त्यामुळे करोनाची लाट ओसरली असली तरी करोनाचा धोका अजून टळलेला नाही. हे या घटनेवरुन लक्षात येत आहे.