पुणे – मागील वीस – पंचवीस वर्षांपासून गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याची चळवळ सुरु झाली. याचा पहिला प्रयोग पुण्यात करण्यात आला. त्या पाठोपाठ कोल्हापूर, नाशिक या ठकाणीसुद्धा पर्यावरण पूरक उत्सवाचे प्रयोग राबविण्यात आले, अर्थात यामध्ये निसर्ग, पर्यावरण प्रेमी संस्था आणि स्थानिक मंडळे यांचा सहभाग होता.
जसं जशी वर्षे उलटत गेली, त्यात बदल होत गेले, उत्सवाचे स्वरूप आणि उत्सव मूर्ती बदलली. यंदा कोरोनामुळे अगदी साधेपणाने गणेश उत्सव साजरा होतोय. मात्र पर्यावरण पूरक नक्की होतोय याचे मात्र समाधान आहे. पुण्यातील कागद, लगदा या महामंडळे यंदा ९०% कागदाचा लगदा आणि १० % शाडूची माती वापरून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. सोबतच नैसर्गिक रंग सुद्धा वापरण्यात आले आहेत.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी गेल्या वर्षी काही तरुण कलाकार एकत्र आले. वर्षभर त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून कागदाचा लगदा आणि पाण्यात विरघळणारे साहित्य वापरून सुबक मूर्ती तयार केली आहे.पुणे मध्ये या गणेश मूर्तींचे स्टॉल लावले आहेत.
मूर्ती बनविताना त्यांनी पाणी शुद्ध करणारे घटक वापरल्याने मूर्तींचे विसर्जन घरीच करता येणार आहे. पु पुण्यातील कृषी महाविद्यालयच्या शेजारील केंद्रात या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्लास्टर ऑफ पॅरिस’ला पर्याय म्हणून शाडूमातीच्या गणेश मूर्तीला प्राधान्य देण्यात येते. मात्र, मागणीच्या तुलनेत त्यांची संख्या कमीच असते. शाडूच्या मातीलाही पर्याय हवा, ही मूर्ती सात ते आठ तासात पाण्यात विरघळते, असा निर्मात्यांचा दावा आहे. दिनेश लोहपत्रे म्हणले, ‘आम्ही समविचारी कलाकार दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान दोन दिवस विविध सामाजिक कामे करतो.
त्याच्याही पुढे जाऊन उत्सव पर्यावरण पूरक करण्यासाठी आपण काही तरी करायला हवे, असा विचार पुढे आले. त्यानुसार कागदाच्या लगद्यापासून मूर्ती करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरापासून आम्ही प्रयोग करीत होतो. यामध्ये अधिकाधिक घटक नैसर्गिकरित्या विघटन होणारे असावेत, हा आमचा आग्रह होता. या शिवाय मूर्तीला नैसर्गिक रंग आणि विरघळणारा कागद वापरला आहे.