बारामती – कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी टाळेबंदी अत्यावश्यक असली तरी यामुळे अर्थव्यवस्था मात्र ठप्प झाली आहे. टाळेबंदीमुळे अनेक व्यवसायांचे कंबरडे मोडले असून आधीच अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला देखील घरघर लागली आहे. याच पार्श्वभूमीवर साखर उद्योगाला वाचवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करणारे पत्र जेष्ठ नेते शरद पवार यांनी पंतपधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते.
शरद पवारांच्या या पत्रावर बोचरी टीका करताना निलेश राणे यांनी, “साखर उद्योगाला आजवर झालेल्या मदतीचे ऑडिट व्हायला हवे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा?” असे ट्विट केले होते.
दरम्यान, निलेश राणे यांच्या या ट्विटला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले असून आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर त्यांनी, “मी आपणास सांगू इच्छितो की @PawarSpeaks
साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी.” असा संदेश दिला आहे.
मी आपणास सांगू इच्छितो की @PawarSpeaks साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात.
त्यामुळे काळजी नसावी. https://t.co/Fqe9QWKBlQ— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 16, 2020