नवी दिल्ली – एखादे जोडपे पती- पत्नीसारखे राहत असेल अन त्यातील पुरूष हा क्रूरपणे वागत असेल तर त्यांच्यातील संबंध हे बलात्कार ठरतात का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानेच विचारला आहे. विवाहाचे आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका त्याने दाखल केल्यावर न्यायालयाने ती फेटाळण्यास नकार दिला आहे.
पती पत्नीसारखे राहणाऱ्या जोडीतील पुरूष भलेही क्रूर वागत असेल. मात्र त्यांच्यात नंतर झालेले संबंध बलात्कार ठरू शकतात का, असा प्रश्न न्यायालयाने सुनावणीच्या काळात उपस्थित केला आहे. आपल्याविरूध्दची याचिका फेटाळण्याची त्या व्यक्तीची याचिका भलेही न्यायालयाने फेटाळली आहे. मात्र त्याला त्याच्यावरील आरोप रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्याचे स्वातंत्र्य दिले. त्याचप्रमाणे आठ दिवस अटकेपासून संरक्षणही दिले.