नवी दिल्ली: येत्या काही दिवसात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) पक्षांमध्ये आणि भाजप पक्षामध्ये शाब्दिक चकमत उडालेली सुद्धा दिसून येत आहे. अशातच तृणमूल काँग्रेस पक्षाला राम-राम करत शुभेंदु अधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या दरम्यान अधिकारी यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला नक्कीच विजय मिळेल अस म्हणत असून तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखती शुभेंदु अधिकारी म्हणाले, ‘ शाळेत असतांना मी नियमित आरएसएस च्या शाखेला जात होतो. मागील काही काळात क्तीगतरित्या तृणमूल काँग्रेसमध्येही याविरोधात आवाज उठवला. आजवर मी कधीच राजकीय मंचावर जय श्रीराम म्हटलं नाही, मात्र आता मी जय श्रीराम बोलणार आहे. ते पुढे म्हणाले, मंदिरात जाण्यात काय चुकीचं आहे? मी कार्यकर्ता असल्याच्या नात्यानं भाजपाच्या धोरणांचं पालन करत आहे. ” असं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला नक्कीच विजय मिळेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.