मुंबई – बॉलिवूड स्टार्स अनेकदा सिनेसृष्टीतील घराणेशाहीवर भाष्य करतात. ज्यामध्ये अभिनेत्री कंगना राणावतच नाव सर्वात आधी घ्यावं लागले. कारण बॉलिवूडमध्ये आतापर्यंत घराणेशाहीवर इतकी कोणी बोललं नसेल जितकं कंगना बोलली आहे. यासंबंधी बोलताना कंगनाने करण जोहरपासून ते खान ब्रँडपर्यंतच्या सर्वांनाच अनेकदा धारेवर धरलं होत. आता मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेनं देखील याच मुद्द्यावर भाष्य केले आहे.
मराठी टीव्ही सिरीयलपासून ते हिंदी सिनेमा असा प्रवास करणारा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे तसा कधीही वादग्रस्त विधान करत नाही. एवढच काय श्रेयस चिप पब्लिसिटीसाठी इतर कलाकारांप्रमाणे कॉट्रव्हर्शियल फंडे देखील वापरात नाही. यामुळे एक गुणी अभिनेता म्हणून श्रेयसची ओळख आहे.मात्र नुकतंच श्रेयसने केलेली एक कृती चांगलीच लक्षवेधी ठरलं आहे.
श्रेयसने नुकतीच एका मराठी शोमध्ये हजेरी लावली. यावेळी श्रेयसने विविध विषयांसह आपल्या खाजगी आयुष्याबाबत देखील गप्पा मारल्या. यावेळी श्रेयसला काही पत्रे देण्यात आली होती आणि ही पत्रे तो कोणाला देऊ इच्छितो असे विचारण्यात आले होते. यातील एका पत्रात “आता भेटलात पुन्हा भेटू नका” असं लिहिलं होत आणि हे पत्र तू कोणाला देणार ? असं श्रेयसला विचारण्यात आलं होत.
“हे फक्त फक्त एकच व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही. घराणेशाही करणाऱ्या सगळ्यांना मला हे पत्र द्यायचं आहे की, ‘आता भेटलात पुन्हा नका भेटू’ असं उत्तर यावेळी श्रेयसने दिल. श्रेयसच्या या एका वाक्यातील उत्तराने त्याने खूप न बोलताही बऱ्याच भावना सर्वांसमोर ठेवल्या आहेत. एकूणच श्रेयसला देखील आपल्या अभिनय कारकिर्दीमध्ये घराणेशाहीचा सामना करावा लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे.