पुणे – करोनामध्ये आर्थिक परिस्थिती खालवल्याने एका उच्चभ्रू कुटूंबाने दर अमावस्येला अघोरी पुजा करण्याचा घाट घातला. या अघोरी पुजेसाठी सुनेला जबरदस्ती बसवून तीला मृत प्रेताची राख पिण्यास भाग पाडले . एकदा तीने राख पिण्यास नकार दिल्याने पिला पिस्तूलाचा धाकही दाखवण्यात आला. तसेच तीला कोकणात नेऊन मध्यरात्री धबधब्याखाली आंघोळ करण्यास भाग पाडले. या अघोरी प्रकाराविरुध्द विवाहित महिलेने तक्रार दाखल केली आहे.
जयेश कृष्णा पोकळे, श्रेयश कृष्णा पोकळे, ईशा श्रेयश पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे, कृष्णा विष्णु पोकळे, दिपक जाधव, स्नेहा जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी सासरच्या लोकांवर विवाहितेचा छळ आणि नरबळी व अमानुषअनिष्ट प्रथा व जादुटोणा अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
विवाहितेने दिलेल्या तक्रारीनूसार, तीचा साखरपुडा 2019 मध्ये एका पंचतारांकीत हॉटेलात पार पडला, यानंतर तीचा विवाह झाला. दरम्यान करोनामुळे तीच्या सासरची आर्थिक परिस्थिती ढासळली. यामुळे सासरचे प्रत्येक अमावस्येला काळे कपडे घालून अघोरी पुजा करत होते. त्या पुजेमध्ये टाचणी लावलेली लिंबू, काळया बाहुल्या, मिरची, हळदी-कुंकू-बुक्का असे होते. त्यावेळी जाव कोणत्यातरी मांत्रिक महिलेला व्हॉट्सऍपचे माध्यमातून व्हिडीओ कॉल लावुन पूजा करत होती. पुजेला विवाहितेला बळजबरीने बसविले गेले
एका अमावस्येच्या दिर, जाऊ, पती व सासुसासरे यांन स्मशानभुमीमध्ये घेऊन जाऊन तेथे जळालेल्या मृत प्रेताची काही हाडे गोळा केली व राख मडक्यात घेतली. ते सगळं घरी आणुन त्याची पूजा केली. त्यानंतर ते हळदी-कुंकू व स्मशानामधुन आणलेली राख पाण्यामध्ये मिक्स करून विवाहितेला एकटीलाच पिण्यासाठी दिले.
सासरच्या लोकांच्या भितीपोटी मी ते पाणी पिले. यानंतर जावेच्या आईवडिलांच्या निगडी येथील घरी नेले. तेथे मांत्रिक महिलेने मला पुजेच्या ठिकाणी बसण्यास सांगितले. पुजेमध्ये मृत मानसाचे केस, हाडे, घुबडाचे पाय व कोंबड्याचे मुंडके हे सर्व जावेच्या आईवडिलांनी अगोदरच आणुन दिले होते. तसेच सदर मात्रिक महिला अर्धा तास अघोरी पुजा करत होती. त्यानंतर हाडाची पावडर करून विवाहितेला एकटीलाच त्या मात्रिक महिलेने खायला सांगितली. तीने नकार दिला असत रिव्हॉल्व्हर काढुन तीच्या डोक्याला लावुन पावडरखाण्यास भाग पाडले.
विवाहिता बीई (कॉम्पुटर) असून तीच्या सासरच्यांना बांधकामाचा व्यवसाय आहे. तर तीचे वडिलही बडे व्यवसायीक आहेत. त्यांनी लग्नात 80 तोळे सोने दिले होते. तसेच प्रत्येक सणाला जावयाला एखादा सोन्याचा दागिणा केला होता. असे एकूण 90 तोळे सोने दिले. तसेच लग्नात 60 ते 70 लाख खर्च केला. एक दहा लाखाची बाईक आणि दोन चारचाकी गाड्या अशी 30 ते 40 लाखाची वाहनेही दिली आहेत. मुलबाळ होत नाही म्हणून मांत्रीकाच्या सांगण्यानूसार मे 2022 मध्ये विवाहितेला माहेरी पाठवून देण्यात आला. याप्रकरणात ऍड. हेमंत झंजाड आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विवाहितेला सहकार्य केले.
विवाहितेने दिलेल्या तक्रारीनूसार पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. व्यवसायाची भरभराट आणि मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुन सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ करण्यात येत होता. याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
– शैलेश संखे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता)