मुंबई – विधानसभा निवडणुकीत ‘१० रुपयात पोटभर जेवण’ हा मुद्दा चांगलाच गाजला होता. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र १० रुपयात जेवण देण्याचं आश्वासन दिलं होतं.
दरम्यान, ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेनं आपलं वचन पाळलं आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना १० रुपयात जेवण ही योजना महाराष्ट्रात राबण्यात येणार आहे.
शिवभोजनचा पहिल्या टप्पयात पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात सुरू होणार आहे. १०० ग्रॅम भाजीची वाटी, ३० ग्रामच्या २ चपात्या, १०० ग्रॅम वरण आणि १५० ग्रॅम भात अशा प्रकारची शिवथाळी असणार आहे. नागरिकांना या योजनेचा लाभ दुपारी ११ ते २ या वेळात घेता येणार आहे.