मुंबई – शिवसेनेशी वैचारिक मतभेद आहेत, शत्रुत्व नाही, असे सूचक विधान काल माजी मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी केले होते. त्यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “आता आमीर खान आणि किरण राव यांच पहा. रस्ते वेगळे झाले आहेत पण मित्र आहेत… तसंच आहे. आमचे मार्ग बदलले आहेत, पण मैत्री कायम आहे. राजकारणात मैत्री कायम राहील. पण याचा अर्थ आम्ही सरकार बनवणार असा नाही.” ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपासोबतच्या संबंधांवर भाष्य केले आहे. राजकारणात मार्ग बदलतात, मात्र मैत्री कायम राहते असे सागंत भाजपासोबत मतभेद आहेत, मात्र मैत्री कायम आहे असे राऊत यांनी स्पष्ट करत असताना यावेळी आमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचे उदाहरण दिले.
संजय राऊत म्हणाले की “देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत शत्रुत्व नाही असं म्हटलं आहे. मतभेद नक्कीच आहेत आणि मीदेखील हेच सांगत आहे. आम्ही काय भारत पाकिस्तान नाही. भेटीगाठी होत असतात, चर्चा होती असते. पण आता आमचे राजकीय रस्ते बदलले आहेत. फडणवीसांनी हेच सांगितलं आहे,” “आता आमीर खान आणि किरण राव यांच पहा. रस्ते वेगळे झाले आहेत पण मित्र आहेत… तसंच आहे. आमचे मार्ग बदलले आहेत, पण मैत्री कायम आहे. राजकारणात मैत्री कायम राहील. पण याचा अर्थ आम्ही सरकार बनवणार असा नाही.”
भाजप-सेना युती होऊ शकते या फडणवीसांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, “त्यांच्याकडे जास्त माहिती असेल. परिस्थिती आता काय आहे आणि भविष्यात काय असेल याबद्दल कोणीही सांगू शकत नाही. सध्या महाराष्ट्रात जी राजकीय व्यवस्था आहे, जे सरकार आम्ही बनवलं आहे ते उत्तम चालू आहे. उद्धव ठाकरे नेतृत्व करत असून सरकार पाच वर्ष चालणार नाही”. दरम्यान यावेळी त्यांनी पत्र लिहिण्याचे धंदे शिवसेनेने केले नाहीत अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.
शिवसेनेशी वैचारिक मतभेद आहेत, शत्रुत्व नाही, असे सूचक विधान करीत राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय होतात आणि जर-तरला कोणताही अर्थ नसतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले होते.