ज्ञानदेव रांजणे यांचा केला सत्कार
कुडाळ – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजप सोडून जातील अशी आवई अनेकदा उठवण्यात आली. मात्र, ते गेले नाहीत हे त्यांचे मोठेपण व भाजपचे यश आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जावळी तालुक्यातून ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केला, संघर्षावर मात करून रांजणे यांनी मिळवलेला हा विजय महत्वपूर्ण आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
आंबेघर ता. जावळी येथे ते बोलत आहेत. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी भावना आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मतेही विचारात घेतलं जाईल. या याबतचा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी माहितीदेखील चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, “जिल्हाबँकेवर जावळी सोसायटीच्या हाय होल्टेज लढतीत ज्ञानदेवरांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यासाठी मुद्दाम आलो आहे. सामान्य कुटुंबातील रांजणेयांचा विजय हा महत्वपूर्ण असल्याने त्यांचा सत्कारभाजपच्यावतीने आज करण्यात आला. मी विद्यार्थीचळवळीतून पुढे आलो असून संघर्ष करण्याऱ्या व्यक्तींचेमला अप्रुप आहे. त्यामुळं मी आज रांजणे यांचा सत्कारकरण्यासाठी आलो आहे.”
योग्य वेळ आल्यावर राज्य सरकार निश्चित पडेल. जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका भाजपनं स्वबळावर लढाव्यात, असा आग्रह आहे. मात्र, याबाबत काय निर्णय घ्यायचा हे स्थानिक पातळीवर असलेले कार्यकर्ते यांचे मत घेऊन ठरवलं जाईल. भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष होण्यासाठी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढाव्यात, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रांजणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, भाजपचे जिल्हा चिटणीस विठ्ठल देशपांडे, गीता लोखंडे, नगरसेवक विकास देशपांडे, दत्तात्रय पवार, तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, हरिभाऊ शेलार, मच्छिंद्र क्षीरसागर, बबनराव बेलोशे, जयदीप शिंदे, सागर धनावडे, अंकुश बेलोशे, शिवाजीराव गोरे, भानुदास ओंबळे, सानिया धनावडे, सुरेखा धोत्रे, प्रशांत करंजेकर यांची उपस्थिती होती.