नवी दिल्ली – लोकसभेत विरोधी पक्षातील खासदारांच्या घोषणाबाजीदरम्यान केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदे रद्द करणारे विधेयक 2021 सादर केले. काही वेळातच कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेकडून मंजूर करण्यात आले . यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यावेळी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली होती.
संसदेचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. विरोधकांनी पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्षाला घेरले आहे. या दरम्यान तीन कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेने मंजून केले आहे. मात्र लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आज लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदा रद्द करणारे विधेयक 2021 सादर केले. दरम्यान काही वेळातच कृषी कायदा विधेयक लोकसभेने मंजूर केले.