सिंधुदुर्ग : वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. गृहमंत्री भाजप नगरसेवक अमित शहांच्या दौऱ्यानंतर फुटल्याने या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
ज्यांना तिकिटे मिळण्याची अपेक्षा नव्हती. ते पक्ष सोडून गेले. जे पक्ष सोडून गेले त्यांना पश्चाताप होईल. तसेच, मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात भाजपाच्या ताटातील उरलेले खरकटे खाऊन शिवसेना पोट भरतेय, अशा शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात भाजपाच्या ताटातील उरलेले खरकटे खाऊन शिवसेना पोट भरतेय!@BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/CnX0aukReK
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 9, 2021
दरम्यान, भाजपची वाभदे-वैभववाडी नगरपंचायतमध्ये एकहाती सत्ता होती. भाजपकडे 17 पैकी 17 नगरसेवक होते. पण सोमवारी त्यातील 7 नगरसेवक फुटून आज शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.