शिरूर -धारावी, घाटकोपर, मालेगाव आदी करोना हॉटस्पॉट असलेल्या परिसरातून शिरूर आणि तालुक्यात नागरिक दाखल होत असल्याने तालुका करोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त होत आहे. तरी बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांची माहिती लपवू नका ती तात्काळ प्रशासनास देवून आपला व तालुक्यातील जनतेचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
तालुक्यातील टाकळी येथे धारावीतील काही नागरिक तर कवठेयेमाई येथे हे मुंबईतील घाटकोपर परिसरातील काही नागरिक आली होती. त्यापैकी कवठे माहिती चार नागरिकांपैकी तीन नागरिक मंगळवारी (दि. 19) करोना पॉझिटिव्ह निघाल्याने संपूर्ण शिरूर तालुका हादरून गेला आहे. दरम्यान, हॉटस्पॉट परिसरातून नारिक शिरूर तालुक्यातील अनेक गावात आता रोजच दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात प्रवेश करू लागले आहेत.
यामुळे शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत शिरूर नगरपरिषद यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच शिरूर तालुक्यातील अनेक गावातील स्थानिक नागरिक भावनेपोटी आपल्या घरी आलेले कोरना हॉटस्पट एरियातील नागरिक, नातेवाईक यांची माहिती देत नाहीत. त्यामुळे शिरूर तालुक्यात शिरूर शहरात करोना पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आपल्या भागात गावात येणाऱ्या नागरिकांची माहिती नातेवाइकांनी प्रशासनास द्यावी. क्वारंटान म्हणजे हॉटस्पॉट परिसरातून आलेल्या नागरिकांची सुरक्षितता त्याबरोबर त्याच्या स्थानिक नागरिकांची सुरक्षितता. तरी नागरिकांनी क्वारंटाइनबाबत गैरसमज करू नये.
– महेश रोकडे, मुख्याधिकारी, शिरूर, नगरपरिषद