Shashi Tharoor : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभेत सुमारे तासाभराच्या भाषणात अर्थमंत्र्यांनी अनेक योजनांची घोषणा केली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अंतरिम अर्थसंकल्पावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केला आहे.
अंतरिम अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, हे रेकॉर्डवरील सर्वात लहान बजेट भाषणांपैकी एक भाषण असल्याचे म्हटले. तसेच अर्थसंकल्पातून काहीही निष्पन्न झाले नाही आणि नेहमीप्रमाणे बरीच विधाने झाली असल्याचे सांगत केंद्र सरकारवर टीका केली.
पुढे बोलताना शशी थरूर यांनी, अर्थमंत्री परकीय गुंतवणुकीबाबत बोलल्या, मात्र परकीय गुंतवणुकीत मोठी घट झाली असल्याचा उल्लेख केला नाही” असे म्हटले. तसेच सीतारामन यांनी अस्पष्ट भाषा वापरली आहे. भाषणात फार कमी आकडे वापरण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
“अर्थसंकल्पातून फारसे काही समोर आले नाही. नेहमीप्रमाणेच खूप वक्तृत्वपूर्ण भाषा, कोणत्याही योजनेविषयी फारच कमी ठोस अंमलबजावणी संदर्भात अर्थमंत्र्यांनी म्हटल्याचे सांगत शशी थरूर यांनी अर्थसंकल्पीय भाषण अत्यंत निराशाजनक असल्याचे सांगितले.