नवी दिल्ली : देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. राज्यसभा निवडणूकीनंतर आता देशाचे सर्वोच्च पद राष्ट्रपतीपदाची निवडणुकीचा राजकीय धुरळा उडताना दिसत आहे. दरम्यान, या पदासाठी सर्वात जास्त चर्चेत राहिलेले नाव म्हणजे शरद पवार यांनी या निवडणुकीच्या शर्यतीत आपण नसल्याचे म्हणत. त्यामुळे आता विरोधकांनी दुसऱ्या उमेदवारासाठी हालचाली सुरु केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षातील काही नेत्यांनी फोनवरुन पश्चिम बंगालचे राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारण्यासाठी विनंती केली यावेळी विरोधकांनी केली असल्याचे म्हटले जात आहे. २०१७ मध्ये गोपाळकृष्ण गांधी विरोधकांकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. पण या निवडणुकीत व्यंकय्या नायडू यांनी त्यांचा पराभव केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधकांकडून इतर काही नावांवरही विचार केला जात आहे. गोपाळकृष्ण गांधी २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यांनी विरोधकांकडे विचार करण्यासाठी काही वेळ मागितला असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान त्यांच्याशी चर्चा केलेल्या नेत्यांनी त्यांनी सकारात्मकपणे प्रतिसाद दिल्याचे म्हटले आहे.
गोपाळकृष्ण गांधी यांनी होकार दिल्यास एकमताने त्यांच्या नावाला संमती दिली जाण्याची शक्यता आहे. याआधी विरोधकांकडून त्यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली गेली असल्याने विरोध होणार नाही असा अंदाज आहे. ७७ वर्षीय गोपाळकृष्ण गांधी यांनी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे. ते महात्मा गांधी आणि सी राजगोपालचारी यांचे नातू आहेत.