पुणे – नंदुरबारमधील निकालाचे आश्चर्य नाही. मात्र इतर ठिकाणी पुणे व नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेले यश महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीने एकत्रित येऊन वर्षभर केलेले काम लोकांनी स्विकारले आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. त्याला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, मागील वेळी विधान परिषदेला कसे निवडून आले हे चंद्रकांत पाटील यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी विधानसभेला पुण्यातील सुरक्षित मतदार संघ निवडला. चंद्रकांत पाटलांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता. त्यामुळे ते जे बोलतात त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
तर धुळे, नंदुरबार निर्णय हा काय अजिबात आश्चर्यकारक नाही. निर्वाचित होते तेच त्याच्या हाती मिळाले. तो त्यांचा खरा विजय नाही. गेल्या वर्षभर काम करून दाखवलं. यामध्ये मुख्यतः नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती. तो कॉग्रेसनं जिंकला. हा महाराष्ट्रातील निकाल महाविकास आघाडीचा सर्वात मोठा विजय आहे.
महाविकास आघाडी सरकारने एकत्र काम केल त्याच हे यश असल्याचे पवार यांनी सांगितले. पुणे मतदारसंघतही आम्हाला यश मिळवता आल नव्हत. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारले आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. चंद्रकांत पाटील यांना विनोदी विधान करण्याचा लौकिक आहे. चंद्रकांतदादा मागच्या वेळेस विधानपरिषदेला कसे निवडून आले. गेल्यावेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते. त्यामुळे ते निवडून आले. त्यामुळेच पुणे शहरातील त्याच्या सोयीचा मतदारसंघ निवडला. त्यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ निवडला नसता, असा टोला पवार यांनी लगावला.