Shahjibapu Patil । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशासह राज्यातही जागा वाटपावरून मोठ्या हालचाली सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधक सध्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यात मग्न असल्याचे दिसतंय. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राज्यत दौरा सुरु आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राज्यात येणार आहेत. हे सगळं सुरू असताना राजकीय वर्तुळात शिंदे गटाच्या एन नेत्याने केलेल्या दाव्याची मोठी चर्चा होताना दिसतीय.
एक हजार टक्के खात्री सांगतो….Shahjibapu Patil ।
शिंदे गटाच्या आमदाराने “एक हजार टक्के खात्री सांगतो उद्धव ठाकरे भाजपासह जातील आणि लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. असे म्हटले आहे. शिंदे गटाचे हे आमदार म्हणजे शहाजी बापू पाटील आहेत. त्यांनी हा दावा केला आहे.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील? Shahjibapu Patil ।
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहाजीबापू पाटील यांनी, “एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो. आपला अंदाज चुकणार नाही. दिवस कुठला ते बघावं लागेल. असे म्हटले. एवढंच नाही तर हे दोन्ही पक्ष आणि नेते एकत्र येण्यामागे जे कारण आहे त्याचाही खुलासा त्यांनी केला.
पुढे बोलताना शहाजी बापू म्हणाले, “पण हे व्हावंच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही. पंतप्रधान मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावं लागण्याचा दिवस येणार आहे. लवकरच येणार आहे, राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळं वातावरण आहे. अशा वातावरणात जर उद्धव ठाकरेंनाही वाटलं की आपणही भाजपासह जावं तर त्यात गैर काही नाही. महायुतीला लोकसभा निवडणुकीत ४५ जागा मिळतील असाही दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा
अमित शाहंनी महाराष्ट्रात येऊन केली जागावाटपाची खेळी ? शिंदेंच्या शिवसेनेला फक्त मिळणार इतक्या जागा ?