राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ः सणसरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम
भवानीनगर -राजकीय पदे येतात जातात, परंतु पदावर असताना गोरगरीब जनतेसाठी चांगले काम केले तर हीच गोरगरीब जनता तुम्हाला कधीच विसरणार नाही. त्यासाठी कायम जनतेमध्ये राहूनच जनतेची सेवा करा. हे उदाहरण कोणते पुस्तक वाचून मिळणार नाही. स्वतः माझ्याकडे बघून समाजाने पुस्तक वाचावे कारण जनतेने दिलेल्या आजवरच्या प्रेमामुळेच मी राज्यमंत्री म्हणून उभा आहे, असे मत बांधकाम, सामान्य प्रशासन व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
सणसर (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या वतीने रविवारी (दि. 2) महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती कारखान्याच्या माजी संचालिका शीलादेवी निंबाळकर होत्या.
यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, सरपंच माधुरी नरुटे, राजमाला गायकवाड, उपसरपंच बाबासाहेब निंबाळकर, संजय निंबाळकर, विजयसिंह निंबाळकर, छत्रपतीचे संचालक रणजीत निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर, यशवंत नरुटे, पांडुरंग निंबाळकर, विक्रम निंबाळकर, हेमंत निंबाळकर, प्रकाश नेवसे, अमोल भोईटे, सचिन सपकळ, पिंटू गुप्ते, दत्तात्रय निंबाळकर, भाऊसाहेब सपकळ, वसंत जगताप, अभयसिंह निंबाळकर, दीपक निंबाळकर, पोलीस पाटील राजेंद्र चव्हाण, श्रीनिवास कदम, शरद कांबळे, नानासो निंबाळकर, धनंजय गायकवाड, पार्थ निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना मदत म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
सणसर ग्रामपंचायतीच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी या एकाच छताखाली सर्व विभागातील मिळणाऱ्या सुविधांच्या ठिकाणी आज सणसर गावातील व परिसरातील नागरिकांनी याठिकाणी येऊन त्या-त्या विभागातील अडचणी प्रत्येक विभागांमध्ये जाऊन सांगितल्याने एकाच जागेवर नागरिकांच्या अडचणींचे निवारण झाले.
रेशन कार्ड गहाळ झाल्याबाबत भवानीनगर पोलिसांच्यावतीने 154 नागरिकांना रेशन कार्ड हरवल्याचा दाखला देण्यात आला. एकाच ठिकाणी एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजना राबवून गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्याचे काम शासन आपल्या दारी या योजनेतून केल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे व शासनाच्या माध्यमातून सर्व विभागाने केलेल्या कामाचे कौतुक केले.
जरा मलाही समजून, सांभाळून घ्या
तालुक्याच्या विकासासाठी मी कायम तत्पर असतो. जे काही कामे करता येतील ती कामे करण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. शासनाच्या माध्यमातून काम करण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील असणार आहे. राज्यावर गेलोय मलाही समजून सांभाळून घ्या म्हणजे एकत्र येऊन चांगले काम करून तालुक्याचा अजूनही मोठ्या प्रमाणात विकास करू असेही मत दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.