पुणे – ज्येष्ठ नागरिकाची 50 हजारांची रोकड असलेली बॅग हिसका मारून फरार झालेल्या टोळीला विश्रामबाग पोलिसांनी सहा तासांत अटक केली. अली अजगर इकबाल नजे (38, रा. कल्याण), यसीन इमाम शेख (24, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), राज ऊर्फ राजेश सिंग (35, रा. मुंबई) आणि रवींद्र पांचाळ (50, रा. कल्याण) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांनी यापूर्वी विश्रामबाग हद्दीत अशा प्रकारे आणखी एका गुन्हा केला आहे.
याबाबत शुक्रवार पेठेत राहणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील एका बॅंकेतून 50 हजार रुपये काढले. शनिलार चौकातून जात असताना पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांची बॅग पळविली.
पोलिसांनी सीसीटीव्हीवरून शोध घेऊन सोमवार पेठ येथील एका लॉजमधून चौघांना अटक केली. आणखी दोघांबाबत चौकशी केली. त्यावेळी ते मुंबईला पळून गेल्याचे सांगण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंडलिक कायगुडे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक राकेश सरडे, पोलीस अंमलदार संजय दगडे, शरद वाकसे, हेमंत पालांडे, प्रशांत सिंदे, सातप्पा पाटील, सागर गोंजारी, प्रशांत पालांडे, ज्ञानेश्वर पिंगळे यांनी ही कारवाई केली.