जालना – राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नाहीत, असे स्पष्ट मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. तसेच केंद्र सरकारकडून ओमायक्रॉनमुळे 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणाला स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात उड्डाणाबाबत केंद्र सांगेल त्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
फ्रंट लाइन वर्कर्सना बूस्टर देण्यासाठी या भूमिका घ्यावी, अशी मागणीही टोपे यांनी केली. या संदर्भात सकारात्मक निर्णय झाल्यास तो स्वागतार्हच राहील, असेही टोपे म्हणाले. एका संकेतस्थळावर याबाबत बातमी देण्यात आली आहे.
परदेशातून राज्यात आलेल्यांचा शोध सुरू आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्यांना शोधू आणि त्यांच्या चाचण्या करू. महाराष्ट्रात संक्रमित व्यक्तींकडून करोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, नागरिकांनी लसीकरण तातडीनं करून घ्यावे. करोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.