सातारा – स्वच्छ भारत अभियानात देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेचा पुन्हा एकदा दिल्लीत गौरव करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेतदेखील यश प्राप्त केल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा सोमवारी विज्ञानभवन, दिल्ली येथे सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते व सरपंच आणि स्वच्छता दूतांनी सन्मान चिन्ह स्वीकारले.
देशात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी शौचालय उभारण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करावे, यासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये व्यक्तिगत पातळीवर तसेच जिल्हास्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. व्यक्तिगत पातळीवर व विशेष प्रयत्न केलेल्या 15, जिल्हा पातळीवर 10 आणि राज्य पातळीवर 3 तसेच केंद्र शासित प्रदेशातील 2 स्पर्धकांची या गौरवासाठी निवड करण्यात आलेली आहे. तशा प्रकारचे पत्र 20 जून रोजी संबंधितांना पाठविण्यात आले होते. त्यापैकी सातारा जिल्हा परिषदेसह शिंदेवाडी (ता. जावली) च्या सरपंच धनश्री सुनील शिंदे, धनगरवाडी (ता. खंडाळा) चे सरपंच चंद्रकांत आप्पासाहेब पाचे, बनवडी (ता. कराड) येथील स्वच्छता दूत शंकर मारूती खापे व मठाचीवाडी (ता. फलटण) येथील संदीप आप्पासाहेब