सातारा – कसाराजवळील एका आदिवासी पाड्यातील मुलांना दळणवळण व्यवस्था आणि घरची परस्थिती नसल्यामुळे शिक्षण घेणे जवळ-जवळ अशक्य असल्याचे निदर्शनास आल्यावर संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी फाऊंडेशनच्या मार्फत खाजगी पद्धतीने अंगणवाडी चालू करून तेथील चिमुकल्याच्या भविष्याचा पाया भक्कम करण्याचा निर्धार केला आहे.
या बालवर्गाचा लाभ जवळपास ३० विद्यार्थ्यांना होणार असून त्यांचा शैक्षणिक पाया मजबूत होईल. शिक्षिकेचे मानधन आणि मुलांना लागणारे संपूर्ण शिक्षण हे संकल्प फाऊंडेशन मार्फत कायमस्वरूपी करण्यात येणार असून मुलांची गुणवत्ता तपासून पुढील शैक्षणिक धोरण ठरविण्यात येणार असल्याचे प्रवीण जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अंगणवाडी सुरू करताना तेथील परिस्थिती, मुलांच्या गरजा याचा आढावा घेऊन संपूर्ण शैक्षणिक साहित्य, दप्तर तसेच गणवेश इ. वस्तु शिक्षिका मनीषा मोरे यांच्याकडे सुपूर्द करून मुलांची शाळा भरविण्यात आली. अशा प्रकारचा खाजगी बालवर्ग अंगणवाडी उपक्रम हा प्रथमच एखाद्या संस्थेमार्फत होत असल्याने संकल्प फाउंडेशनचे विविध स्तरातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.
प्रसंगी संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रवीण जाधव, रघुनाथ सुर्वे, अनिल जांभळे, नवनाथ गवळी, निवृत्ती वाघ, सुमित जांभळे, भूषण पवार, मिलिंद घायवट, प्रज्वल शिंदे, मैत्रेयी घायवट तसेच शिक्षिका मनीषा मोरे, वैशाली बुधार तसेच गावातील महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.