कोपरगाव – नगर जिल्ह्यातील मानोरी (ता. राहुरी) येथील ॲड. आढाव या दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच वकिलांवरील हल्ले थांबविण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तातडीने मंजूर करावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडे केली आहे.कोपरगाव वकील संघाच्या वतीने सुरू असणाऱ्या साखळी उपोषणाला वकील बांधवांची भेट घेऊन या आंदोलनास कोल्हे यांनी पाठिंबा दिला. तातडीने वकील सुरक्षा हेतूच्या दृष्टीने पावले उचलली जाण्याची भावना व्यक्त केली आहे.
या घटनेबाबत वकील संघटनांनी राज्यभर साखळी उपोषण, मोर्चे आदी मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. ही घटना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. ॲड. आढाव यांच्या हत्येची तातडीने सखोल चौकशी होऊन संबंधित गुन्हेगारांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वत: या प्रकरणात लक्ष घालावे. या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून सदर खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी कोल्हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
वकील बांधवांना संरक्षण मिळण्यासाठी व त्यांच्यावरील हल्ले थांबविण्यासाठी वकील संरक्षण कायदा (ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट) लागू होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने तातडीने योग्य कार्यवाही व्हावी, असेही कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी कोपरगाव बार असो.अध्यक्ष ॲड.मनोहर येवले, उपाध्यक्ष शरद गव्हाणे, ज्येष्ठ विधीज्ञ एस..एम. वाघ, विधीज्ञ एस. डी. कुलकर्णी, ए.जी. देशमुख,ॲड.मच्छिंद्र खिलारी,ॲड.जयंत जोशी,ॲड.वहाडणे, एम.पी.गुजराथी, ॲड.विद्यासागर शिंदे, ॲड.देवकर,अतिश आगवन, ॲड.महेश भिडे, मुन्ना सय्यद, एस.एस. डागा, ॲड.धोर्डे, ॲड.ज्योती भुसे ,ॲड.देशमुख मॅडम , ॲड.प्रेरणा पटणी,ॲड.शिंदे,ॲड.लोढा, ॲड. शादाब शेख,ॲड. योगेश खालकर,ॲड. नितीन पोळ, ॲड. शरद गुजर, ॲड. गणेश मोकळ, ॲड..भास्करराव गंगावणे, ॲड.अनुप ठोळे, ॲड.दीपक पवार, ॲड.काटकर, योगेश जाधव, ॲड.भाकरे,ॲड.लोहकने, ॲड.बाबासाहेब सोनवणे, ॲड.नितीन खैरनार आदींसह वकील बांधव भगिनी उपस्थित होते.
स्नेहलता कोल्हे यांनी तत्काळ ॲड.आशिष शेलार यांच्याशी वकील संघाचा संपर्क करून देत घटनेची दखल घेण्यासाठी ॲड.प्रोटेक्शन ॲक्ट लागू होण्यासाठी आग्रहाची मागणी केली. ॲड.जयंत जोशी यांनी सदर परिस्थिती शेलार यांना अवगत करून दिली. त्यावर त्यांनी यात विशेष लक्ष घालणार आहे, असे सांगितले.