माण- खटावमध्ये फक्त एक दोनच मध्यम पाऊस झाले आहेत. उरलेला मोठा कालावधी पावसात खंड होता. दोन्ही तालुक्यांतील ज्या भागात उरमोडी आणि अन्य योजनांचे पाणी जाते त्या भागातील विहिरींची निवड करुन पाणीपातळी तपासण्यात आली आहे.
अशाच लाभक्षेत्रातील पीकांच्या पानातील आर्द्रता तपासण्यात आली आहे. सर्वेक्षणात या चुका झाल्या आहेत. आता पुन्हा सर्वेक्षण आदेश निघाले आहेत. लवकरच माण- खटावसह इतर टंचाईग्रस्त तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा शब्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
जयकुमार गोरे,आमदार, माण- खटाव