सातारा (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी दि. २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यत अत्यावश्यक सेवामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
वैदयकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस, सरकारी सेवक, विमान कर्मचारी, प्रसारमाध्यम कर्मचारी, बस, ट्रेनचे वाहन चालक आदींनी महामारीसारख्या कठीण काळात केलेल्या निःस्वार्थी सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी दि. २२ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५.००वाजता बाल्कनीमध्ये किंवा घराच्या दाराजवळ उभे राहून त्यांच्यासाठी टाळयांचा कडकडाट केला पाहिजे व कौतुक दर्शविण्यासाठी पाच मिनिटे घंटा वाजविण्याच्या संदेश मोठया प्रमाणात समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.